केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. कर्नाटकमधील भाजप सरकारची 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बंगळुरूमध्ये आयोजित कार्यक्रमातील भाषणाचा हा व्हिडीओ आहे.
आपल्या भाषणादरम्यान स्मृती इराणी यांनी दावा केला होता की राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेचा (Bharat Jodo Yatra) प्रारंभ केला, मात्र स्वामी विवेकानंद (Swami Vivekanand) हे गांधी परिवाराचे सदस्य नसल्याने राहुल गांधींनी स्वामी विवेकानंदांना अभिवादन देखील केले नाही.
आपल्या भाषणात स्मृती इराणी म्हणताहेत, “आज मैं पूछना चाहती हूं कांग्रेस पार्टी से. आप कह रहे हैं आप यात्रा कर रहे हैं भारत को जोड़ने की. अरे, अगर कन्याकुमारी से चले तो कम-से-कम इतनी निर्लज्जता तो ना दिखाते, स्वामी विवेकानंद जी को प्रणाम करके तो बताते. लेकिन वो भी राहुल गांधी को स्वीकार नहीं क्योंकि स्वामी विवेकानंद राष्ट्र संत हैं, गांधी खानदान के सदस्य नहीं.”
दरम्यान, स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणात केलेला दावा खोटा असल्याची बाब समोर आली आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून 7 सप्टेंबर रोजीच राहुल गांधी यांचा स्वामी विवेकानंदांना अभिवादन करतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला होता. व्हिडिओमध्ये राहुल गांधी स्वामी विवेकानंदांना नमस्कार करून त्यांच्या पुतळ्याला प्रदक्षिणा घालताना बघायला मिळताहेत.
पत्रकार आदेश रावल यांनी स्मृती इराणी यांच्या दाव्याची हकीकत सांगणारा व्हिडीओ ट्विट केला आहे.
स्मृती इराणी यांच्या राहुल गांधी यांच्यासंदर्भातील दाव्यानंतर अनेक काँग्रेस नेत्यांकडून देखील इराणींच्या दाव्याचे फॅक्ट चेक करणारे ट्विट करण्यात आले आहेत. काँग्रेस नेते बीवी श्रीनिवास यांनी संदर्भातील व्हिडीओ शेअर करत स्मृती इरानींचा दावा चुकीचा असल्याचे म्हंटले आहे.
हेही वाचा- राहुल गांधी पीठ ‘लिटर’ मध्ये मोजतात? मूळ व्हिडीओ पहा आणि सत्य जाणून घ्या!
(तुम्हालाही एखाद्या बातमीच्या खरेपणावर संशय आहे? एखादा फोटो किंवा व्हिडीओ चुकीच्या माहितीसह व्हायरल होतोय असे वाटतेय? मग अशी संशयास्पद माहिती आमच्या (9172011480) या अधिकृत व्हाट्सएप नंबरवर पाठवा. आम्ही तुमच्यासाठी बातमीची सत्यता पडताळू.
आपण फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील आमच्याशी जोडले जाऊ शकता)
[…] […]
[…] […]
[…] […]